राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना (National Family Benefit Scheme - NFBS )

एनएफबीएस योजना संकटाच्या वेळी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना आर्थिक मदत प्रदान करते. जर कमावत्या व्यक्तीचा वय 18 ते 59 पुरुष किंवा महिला मृत्यू झाला तर सरकार एकरकमी आर्थिक मदत देते. या योजनेसाठी संपूर्ण निधी केंद्र सरकारकडून दिला जातो.

  • ✔ कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला ₹20,000 ची एकरकमी आर्थिक मदत दिली जाते.
  • ✔ गरीब आणि निराधार कुटुंबांचे राहणीमान सुधारण्यासाठी
  • ✔ ही मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते.
  • ✔ या योजनेअंतर्गत, कुटुंब प्रमुखाच्या मृत्यूनंतर 2 वर्षांच्या आत अर्ज करावा लागतो.
  • ✔ या अंतिम मुदतीनंतर योजनेसाठी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
✅ पात्रता
  • महाराष्ट्र राज्याचा किमान १५ वर्षापासून रहिवाशी असावा
  • कुटुंब प्रमुख (मुख्य कमावणारा सदस्य, पुरुष किंवा महिला) यांचे निधन झाले आहे.
  • मृत व्यक्तीचे वय १८ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावे.
  • अर्जदार कुटुंब दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) असले पाहिजे.
  • मृत व्यक्ती सरकारी सेवेत नसावी किंवा सरकारी सेवेतून निवृत्त नसावी.
❌ अपात्र
  • महाराष्ट्र राज्याचा रहिवासी नसल्यास
  • 60 वर्षा वरील व्यक्ती
📄 आवश्यक दस्तऐवज
  • अर्जदाराचे ओळखपत्र, जसे की आधार कार्ड, मतदार ओळखपत्र
  • मृत व्यक्तीचे ओळखपत्र, जसे की आधार कार्ड
  • मृत्युपत्र,दारिद्र्यरेषेचा दाखला (बीपीएल कार्ड),वारसाचे आधार कार्ड
  • बँक खात्याचे पासबुक
  • मृत व्यक्तीचे वय प्रमाणपत्र
  • रहिवाशी दाखला
📝 अर्ज मंजुरी प्रक्रिया
Step 1

अर्ज करण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.

Step 2

तलाठी कार्यालय यांचे कडून मयत व्यक्ती कुटुंब प्रमुख असल्याचा अहवाल.

Step 3

फाईल तलाठी यांच्या कडून तपासून सह्या घ्या.

Step 4

तलाठी यांचे मार्फत मधील सर्व माहिती भरून अर्ज सादर करा.